संविधानामुळेच मी सरपंच झाले - सारिका खिलारे*
संविधानामुळेच मी सरपंच झाले - सारिका खिलारे*

संविधानामुळेच मी सरपंच झाले - सारिका खिलारे*
सोलापूर -: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी सरपंच झाले असे भावुक उदगार डोंगरगाव च्या ( ता. मंगळवेढा ) लोकनियुक्त नूतन सरपंच सौ. सारिका विवेक खिलारे यांनी काढले. सरपंच झाल्या नंतर त्या प्रथमच सोलापूर शहरात आल्या असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम त्यांनी अभिवादन केले. यावेळी मा. श्री आनंद मोरे परिवारातर्फे त्यांचा तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्य बाबासो सय्यद, सुजाता खडतरे व अन्य यांचा ही सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना सारिका खिलारे म्हणाल्या की स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या तत्वावर आधारित संविधान लिहून बाबासाहेबानी महिलांना समान अधिकार मिळवून दिले व मानव मुक्तीच्या लढ्या बरोबर स्त्री मुक्ती चा लढाही त्यांनी पुढे रेटला त्यामुळे स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी. के. साखरे,भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश सचिव विवेक खिलारे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे, निसार पठाण, शब्बीर सय्यद, चंद्रकला मोरे, सीमा गायकवाड, व आनंद मोरे यांच्या सह अन्य उपस्थित होते.
यावेळी विवेक खिलारे यांनी मोरे परिवार यांनी केलेल्या सत्कारा बद्दल म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.